❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

गुरुवार, १० मे, २०१८

स्वानंदासाठी

नारदमुनींना आज काही करमत नव्हते. बरेच दिवस झाले होतेईकडची बातमी तिकडेकरुन. देवलोकात, मृत्यूलोकात चक्क शांतता नांदत होती. शांतता असली की मुनीजी अशांत होत. “काय करावे?” या विचारात सगळेलोकपायाखाली घालून झाले पण काही सुचेना. तसं म्हटलं तरलावालावीकरायला कितीसा वेळ लागतो? पण नारदांची तत्वे आड येत होती. पहिले म्हणजे कळ लावायची पण फक्त सत्याचा आधार घेऊन. ज्याला भडकायचे आहे त्याने स्वतःच बातमीचा गैरअर्थ काढून भडकावे. आणि दुसरे म्हणजे कळ लावल्याने मनोरंजन होत असले तरी फक्त मनोरंजन म्हणून कळ लावायची नाही. त्यातून काही तरी भले व्हावे, कुणाला तरी शिकायला मिळावे, धडा मिळावा. आता या तत्वात बसेल अशी लावालावी करायची म्हणजे थोडा विचार करणे आलेच. नारद चालून थकले, विचार करुन शिणले आणि शेवटी एका केळीच्या बनात थंड हवेच्या आधारे विश्रांतीसाठी थांबले. सकाळपासून हातातल्या विणेवरुन बोटे फिरली नव्हती ना मुखानेहरि नामऊच्चारले होते

थकलेल्या नारदांनी सहज आजूबाजूला पाहीले. समोरच्याच केळीच्या प्रशस्त पानावर काही लिहिले होते. नारदांनी जवळ जाऊन पाहीले. पहिली ओळ वाचली. मग दुसरी वाचली. आणि मुनीजी वाचण्यात अगदी गढून गेले. पुर्ण पान वाचूनही त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी अजुबाजूला पाहिले. दुसऱ्या पानावर ऊर्वरीत मजकुर होता. नारद वाचत होते. पान संपल्यावर दुसरे पान शोधत होते. एकामागोमाग नारदांनी सात पाने वाचली. त्यांचे भान हरपले. कोण नारायण, कोण ब्रम्हा त्यांना काही आठवेना. डोळ्यातुन अश्रू वहात होते. अंतःकरण आनंदाने भरले होते. कधी अनुभवली नव्हती अशी चित्तात शांती अनुभवीत होते
मागून आवाज आलाकाय झालं मुनीवर?”
नारदांनी मागे वळून पाहिले. समोर मारुतीराया ऊभे होते.
नारद म्हणालेहनुमंता, अरे मी आजवर खुप जनांनी लिहिलेलीरामायणेवाचली पण मनाला अद्भुत शांती देणारे तुमचे रामायण अगदी अलौकीक आहे.” हे ऐकुन हनुमंत फक्त हसले आणि आकाशात झेपावत नाहीसे झाले.
अतःकरणातील तो अलौकीक आनंद अनुभवत नारदांनी केळीचे बन सोडले. जसजसे केळीचे बन मागे पडले तसतसा नारदांच्या अंतःकरणातला आनंद कमी होत जाऊनमुळ वृत्तीने डोके वर काढायला सुरवात केली. विचारचक्रांना चांगलीच गती मिळाली. चेहऱ्यावर छद्मी समाधान ऊमटले आणि मनात काही ठरऊन नारदांची पावले वाल्मीकींच्या आश्रमाकडे वळली.

सकाळच्या प्रसन्नवेळी आश्रमाच्या दारात प्रत्यक्ष नारदमुनींना पाहून वाल्मीकींना आनंद झाला. पुष्पहार घालून त्यांनी नारदांचे स्वागत केले. हाताला धरुन आश्रमकुटीत घेऊन नेले. दर्भासनावर आदराने बसवले. फलाहार-दुग्धाहाराची तबके समोर ठेवली. सर्व सोपस्कार झाल्यानंतर वाल्मीकींनी विचारलेमुनीवर, सर्व लोक क्षेम आहेत ना? विष्णूलोकाची काय वार्ता?” 
नारद चेहरा गंभीर करत म्हणालेतुमचेपदसोडून सर्वकाही कुशल आहे आचार्य.”
वाल्मीकींनी गोंधळून विचारलंजरा विस्ताराने सांगीतलं तर काही कळेल मुनीवर.”
नारद मनातला आनंद चेहऱ्यावर दाखवता म्हणालेकालच पृथ्वीलोकात फिरत असताना एक रामायण वाचनात आले. आपण लिहिलेल्या रामायणापेक्षा मला ते जास्त भावले. अर्थात हे माझे मत आहे.”
वाल्मीकींनी विचारलेकुणी लिहिले आहे?”
नारदांनी सांगीतलेश्री मारुतीरायांनी लिहिले आहे.”
नारद फलाहार वगैरे घेऊन, वाल्मीकींचे आदरातिथ्य स्विकारून मार्गस्थ झाले. जाताना वाल्मीकींची मनःशांती घेऊन गेले. त्यांना अतिव दुःख झाले. वाल्मीकींनी खुप विचार केला. नारदांचे कामच आहे लावालावी करणे, त्या मुळे दुर्लक्ष करावे असे त्यांनी ठरवले. पण मन काही ऐकत नव्हते. “माझ्यापेक्षा सुंदर रामायण लिहावे, आणि तेही एका माकडाने!” वाल्मीकी प्रचंड अस्वस्थ झाले. शेवटी तेही एक लेखकच ना! नारद खोटे बोलणार नाही हे नक्की. शेवटी वाल्मीकी नारदांनी सांगीतलेल्यारामायणाच्या शोधात निघाले

काही दिवसांच्या अथक भटकंतीनंतर वाल्मीकींना नारदांनी वर्णन केलेले केळीचे बन सापडले. त्यांनी काही वेळातच केळीचीतीसात पानेही शोधून काढली. ते रामायण वाचता वाचता वाल्मीकींची अवस्थाही नारदांसारखीच झाली. केवळ अप्रतिम. साहित्यिक मुल्यांच्या दृष्टीने परिपुर्ण. भक्तीरसपुर्ण. असामान्य शब्दयोजना. अलौकीक लेखनशैली. सगळ्याच दृष्टीने परिपुर्ण असे ते रामायण वाचताना वाल्मीकींना अश्रू अनावर झाले. आनंदाचे आणि दुःखाचेही
मागून आवाज आलाकाय झाले आचार्य? आपल्याला रामायण आवडले नाही का?”
वाल्मीकींनी मागे वळून पाहीले. समोर मारुतींना पाहुन म्हणालेवर्णनातित आहे हे रामायण.” 
हनुमंताने आश्चर्याने विचारलेमग हे डोळ्यात अश्रू कशासाठी आले आचार्य?”
वाल्मीकी ऊत्तरलेतुझे रामायण निश्चितच माझ्या रामायणापेक्षा श्रेष्ठ आहे. आजवर रामायण म्हटले की माझी आठवण यायची सगळ्यांना. पण तुझे हे रामायण वाचून आता कोणी माझे रामायण वाचनार नाही आणि माझी रामायणकार म्हणुनही कोणी आठवण काढणार नाही.”
बस् एवढेच ना?” असे म्हणून हनुमंताने समोरील केळीची पाने तोडली तुकडे तुकडे करुन खाऊन टाकली.
वाल्मीकी हनुमानाचा तो वेडेपणा पाहून चकीत झाले. त्यांना वाटलेमाकड ते माकडच शेवटीतरीही त्यांनी राहऊन विचारलेहनुमाना, काय केले हे तुम्ही. तुमचेच रामायण नष्ट केले? कशासाठी?”
मारुतीराया हसत म्हणालेतुम्ही रामायण लिहिले ते जगात तुमचे नावरामायणकार वाल्मीकीव्हावे म्हणून. लोकांनी तुम्हाला ओळखावे, कौतूक करावे म्हणून. पण मी जे रामायण लिहिले होते ते फक्त स्वानंदासाठी. माझ्या रामायणातील एक एक शब्द, एक एक ओळ लिहिताना मला अवर्णनिय आनंद झाला. प्रत्यक्ष प्रभुरामाच्या सान्निध्य असल्याचा अनुभव आला. आता जगात फक्त तुमचेच रामायण राहिल आणि ते तुमच्याच नावाने ओळखले जाईल. ‘वाल्मीकी रामायणम्हणुन दोघेही अमर व्हाल.”
खजील होऊन वाल्मीकींनी आपल्या आश्रमाचा रस्ता धरला.

तात्पर्य काय? तर माणसाने रोज काही ना काही लिहावे पण ते आपल्या स्वानंदा साठी. सोशल मिडियावरच्यालाईक्ससाठी नाही. काय म्हणता? :)

(फार गांभीर्याने घेऊ नये :)  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद देताना तो सकारात्मकच असावा असे काही नाही. आपल्याला आवडले नसल्यास का? आणि काय? ते विनासंकोच लिहायला हरकत नाही.

-पद्मनाभ (हरिहर)

Share

मिसळ

गावाकडची मिसळ म्हटल्यावर जिभेवर ताबा ठेवणं मुश्किलच. त्यात सकाळची थंडी, मॉर्निंग वॉकमुळे लागलेली भुक आणि आजुबाजूच्या शेतात पिकांवर पडलेलं दव...