❝माझिये 'मी'पण❞ वर आपले स्वागत आहे... ... ___पद्मनाभ

मंगळवार, ३१ जुलै, २०१८

मा. ल. क. - ७

नगराच्या उगवतीच्या बाजुला सावकारपुत्राचा प्रशस्त असा चौसोपी वाडा होता. वाडा पहाताच त्याच्या सांपत्तीक स्थितिचा, कलादृष्टीचा, रसीकतेचा अंदाज सहज बांधता यायचा. वाड्यासमोरच्या गजशाळेत दोन हत्ती झुलत असायचे. गजशाळेच्या शेजारीच असलेल्या पागेत नामांकीत जातीचे दमदार अश्व चंदी चघळताना दिसायचे. वाड्याच्या परिसरात प्रवेश केल्यावर एक हलकासा सुगंध दरवळत असल्याचे जाणवायचे. सावकारपुत्राने वाड्याचा गिलावा करताना मातीत कस्तुरी मिसळली होती म्हणे. वाड्याच्या आतिल भागात ‘घोट्यापर्यंत पाय रुतावेत’ असे पर्शीयन गालीचे अंथरले होते. छतावर परदेशी व्यापाऱ्यांकडुन खरेदी केलेली अत्यंत नवलाईची अशी प्रचंड काचेची झुंबरे टांगलेली होती. वाड्यातील सर्व नोकरांना अपेक्षापेक्षा कितीतरी जास्त पगार होता. सावकारपुत्राची नुकतीच लग्न झालेली, अतिशय सुंदर पत्नी या सर्वांवर लक्ष ठेवून होती. राजाकडून ‘पालखीचा’ सन्मान मिळालेला होता. सावकारी फक्त नावालाच होती. पिढ्यान् पिढ्या जमवलेली संपत्तीची मोजदाद करणे अशक्य होते. त्यामुळे सावकारीच्या नावाखाली सावकारपुत्र गरीब, गरजु लोकांना मदत करत असे. इतकी संपत्ती असुन सावकारपुत्राला त्याचा ना दंभ होता ना मद. अत्यंत पापभीरु असलेल्या सावकारपुत्राच्या दारातुन कुणीही याचक कधी रिक्त हस्ते माघारी गेला नव्हता. अंगणात रोज शेरभर साखर पडे मुंग्यासाठी. तितकेच धान्य पक्षांसाठी छतावर पडे. रोज किमान शंभर माणसांचा स्वयंपाक रांधला जायचा वाड्यावर आणि नगरातील गरीबांपर्यंत पोहचता व्हायचा. आपल्या हातुन कधीही पापकर्म होउ नये यासाठी सावकारपुत्र नेहमी दक्ष असे.
आज संपुर्ण वाडा विशेष सजवला होता. दर्शनी भाग वेगवेगळ्या फुलांनी शृंगारला होता. दिंडी दरवाजाऐवजी आज वाड्याचे मुख्य द्वार पुर्ण ऊघडे होते. दरवाजाच्या दोन्ही बाजूला सनई-चौघडे वाजत होते. दारावर सोनेरी पानांचे तोरण शोभत होते. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर कनौजी अत्तर शिंपडले जात होते. मुदपाकातुन पक्वान्नाचा सुरेख दरवळ येत होता. सावकारपुत्राला आज पुत्ररत्न प्राप्त झाले होते. पुत्रजन्माचा सोहळा वाड्याबरोबर सगळ्या नगरात साजरा होत होता. आज विशेष भिक्षा मिळेल हे ओळखून अनेक याचकांची वाड्यावर गर्दी होत होती. सावकारपुत्रही मुठी मुठीने मोती, मोहरा, मुद्रा उधळीत होता. आज त्याच्या आनंदाला पारावार नव्हता. दिवस डोक्यावर येता येता वाड्यात नगरातील प्रतिष्ठीतांच्या पंगती बसायला सुरवात झाली. तसेच वाड्याच्या प्रांगणातही नगरवासीयांच्या पंगती बसल्या. मुक्तहस्ताने सुग्रास अन्नाचे वाटप सुरु झाले. वाड्यातील आणि बाहेरील पंगतींवर लक्ष देता देता सावकारपुत्राची आणि इतर नोकरवर्गाची तारांबळ उडाली. दिवसभरात किती पाने ऊठली त्याची मोजदादच नव्हती. दिवस मावळला तरी वाड्याचा दरवाजा बंद नव्हता झाला. अजुनही तुरळक माणसे येत होतीच. उरली सुरली कामे नोकरावर सोपवून सावकारपुत्र जरा चंदनाच्या झोपाळ्यावर विसावला होता. अतिव आनंदाने त्याला किंचीत ग्लानी आल्यासारखे झाले होते. नोकरांनी कार्यक्रम संपला असं समजुन सर्व आवरायला घेतले होते. समया, झुंबरे प्रकाशीत करायला सुरवात झाली होती. वाड्याचा मुख्य दरवाजा बंद करता करता सावकारपुत्राच्या कानावर साद आली “भिक्षां देही” त्याने बाजूलाच असलेली छोटीशी रेशमी थैली उचलली. मोत्यांनी भरली आणि नोकराकरवी पाठवून दिली. आता त्याच्यात ऊठण्याचेही त्राण राहीले नव्हते.
इतक्यात थैली घेवून गेलेला नोकर माघारी आला आणि हात जोडून म्हणाला “महाराज, दारावर साधूमहाराज आले आहेत. पण ते कोरड्या शिध्याव्यतिरीक्त काहीही घ्यायला तयार नाहीत.”
इतक्या निर्मोही साधूला स्वतःच्या हाताने भिक्षा घालावी असा विचार करुन सावकारपुत्राने कोरडा शिधा मागवला आणि स्वतः दरवाज्याकडे वळाला. साधूला पहाताच सावकारपुत्राला खुप समाधान वाटले. तरुण वय, काळीभोर दाढी, तेजस्वी डोळे, चेहऱ्यावर प्रभा असावी अशी कांती. एका हातात झोळी तर दुसऱ्या हातात योगदंड. एकुनच प्रसन्न करणारे व्यक्तीमत्व होते साधूचे. सावकारपुत्राने शिधा असलेले तबक पुढे केले. साधुनेही आपली झोळी पसरली आणि मंद स्मित करत सावकारपुत्राकडे पाहीले. पण क्षणभरातच साधूच्या चेहऱ्यावरचे मंद स्मित मावळले. गंभीर होत त्याने आपली झोळी मागे घेतली. सावकारपुत्रालाही आश्चर्य वाटले. साधूने झोळी परत खांद्यावर अडकवली आणि भिक्षा न स्विकारताच सावकारपुत्राकडे पाठ करुन तो चालू लागला. रिक्त हाताने जाणारा याचक पाहून सावकारपुत्र गोंधळला. जाणाऱ्या साधूच्या मागे धावत त्याने साधूचा रस्ता अडवला. हात जोडून त्याने भिक्षा न स्विकारण्याचे कारण विचारले.
साधू थोडा विचारमग्न होत म्हणाला “मला स्पष्ट दिसत नाही तुझे भविष्य बाळ, पण तुझ्या हातुन ब्रह्महत्या होणार आहे हे नक्की. आणि कोणत्याही प्रकारे हे पातक तुला टाळता येणार नाही. परिणामी मी तुझ्या हातुन भिक्षा स्विकारु शकत नाही.”
हे ऐकताच सावकारपुत्राच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याचे भान हरपल्यासारखे झाले. साधू कधी निघुन गेला हेही त्याला समजले नाही. सुन्न होवून तो वाड्यावर परतला. मुंगीलाही रोज साखर भरवणारे आपण, आणि आपल्या हातुन ब्रह्महत्या होणार हे समल्यावर त्याचे चित्त अस्वस्थ झाले. रात्रभर त्याला झोपही लागली नाही. हे काय होवू घातलेय आपल्या सुखी आयुष्यात तेच त्याला समजेना. यावर त्याला काही उपाय सापडेना. आत्महत्येचाही विचार त्याच्या मनात येवून गेला. पण ब्रह्महत्येइतके मोठे नसले तरी आत्महत्या हेही पातकच. शेवटी पत्नीबरोबर चर्चा करुन सावकारपुत्राने निर्णय घेतला. तरुण वयातच वानप्रस्थ स्विकारायचा. अत्यंत जड अंतःकरणाने पत्नीनेही परवानगी दिली. दुसरा पर्यायच नव्हता. पुढील दोन दिवसात त्याने आपल्या सर्व संपत्तीची व्यवस्था लावली. पत्नीला सर्व समजावून सांगीतले. चार दिवसांच्या आपल्या मुलाला एकदा कुशीत घेतले. सर्व नोकरांचा, नगरवासीयांचा निरोप घेतला. आणि एका शुभ मुहुर्तावर त्याने आपला वाडा, संपत्ती, नातेवाईक सगळं काही सोडून वनाचा रस्ता धरला.

वानप्रस्थ स्विकारण्यामागे फक्त ‘ब्रह्महत्या टाळणे’ एवढाच हेतू होता त्याचा. संसाराच्या सगळ्या जबाबदाऱ्या पुर्ण करुन, पितृऋण, समाजऋण फेडून, जपजाप्य, तप-साधना करने वगैरे उदात्त हेतुने त्याने वानप्रस्थ स्विकारलाच नव्हता. त्यामुळे सावकारपुत्राचे मन सदैव अस्वस्थ राही. पत्नीची, मुलाची आठवण त्याला शांतता मिळू देत नसे. त्याने नदिच्या काठी थोडी जागा साफ करुन तेथे लहानशी झोपडी बांधली. आहारासाठी जंगलातली कंदमुळे, फळे उपलब्ध होती. परांच्या मऊ गादीवर झोपणारा सावकारपुत्र आता दर्भावर झोपत होता. चंदनाच्या चौरंगावर बसुन सोन्याच्या ताटात जेवणारा तो, आता रानकेळींच्या पानावर जेवत होता. सदैव मानसांच्या गराड्यात असणाऱ्या सावकारपुत्राला आता मात्र मनुष्य दिसणेही मुश्कील होते. त्याला सोबत होती ती फक्त जंगली श्वापदांची. दिवसांमागुन दिवस जात होते. सावकारपुत्र आता जंगलात रमला जरी नसला तरी ते आयुष्य त्याच्या बरेचसे सवयीये झाले होते. अंगावरची वस्त्रे कधीच फाटली होती. त्यांची जागा आता वल्कलांनी घेतली होती. दाढी वाढली होती. केसांच्या जटा झाल्या होत्या. आहारात फक्त फळे, कंदमुळे आणि वनगाईंचे दुध असल्याने शरीर मात्र पिळदार आणि काटक बनले होते. जंगलात अन्नाच्या शोधात भटकताना दिवस पुरत नसे. श्वापदांच्या भितिने हातात दणकट, वजनदार काठी असे. दिवस सरले, महिने गेले, वर्षे उलटली. सावकारपुत्राचा दिनक्रम मात्र बदलला नाही. आता तो उतारवयाकडे झुकला होता. दिवसभर त्याचे विचारचक्र फिरत असत. आताआताशी त्याला ‘घेतलेल्या निर्णयाचा’ पश्चाताप व्हायला लागला होता. आपण पाप-पुन्याच्या नादात आयुष्य व्यर्थ घालवले असे त्याला वाटू लागले होते. काय ब्रह्महत्या व्हायची होती हातुन ती झाली असती पण तोवर आपण, आपली संपत्ती कितीतरी लोकांचे आयुष्य सावरुन गेली असती याची त्याला नव्याने जाणीव व्हायला लागली होती. एका यःकश्चीत साधूची भविष्यवानी ऐकून आपण समाजऋणाकडे पाठ फिरवली, स्वार्थी वागलो याचे त्याला अतोनात वाईट वाटे. त्याला त्या साधूचा चेहरा आठवे आणि त्याच्या जीवाची रागाने तगमग होई. एक उमेदीचे आयुष्य आपण मुर्खपणाने वायाला घालवले या विचाराने त्याला आजकाल झोप येत नसे. नेहमी प्रमाणे आजही सावकारपुत्र पहाटे ऊठला. नदिवर जावून स्नान वगैरे ऊरकून तो येतानाच काही फळे, कंदमुळे घेवून झोपडीकडे परतला. हातातली काठी दाराला टेकवून त्याने केळीची दोन पाने खाली अंथरली. त्यावर जमा केलेली फळे व्यवस्थीत मांडून तो जेवायला बसणार इतक्यात त्याच्या कानावर इतक्या वर्षांनी मानवी आवाजातली साद पडली. “भिक्षां देही!” पंचवीस वर्षांपुर्वी हीच साद, याच आवाजातली साद आपण ऐकली होती आणि आयुष्याची वाट लावून घेतली होती हे त्याला आठवले. पण मुळ स्वभावानुसार त्याने काही फळे उचलली आणि भिक्षा घालण्याकरता तो झोपडीच्या दारात आला. समोरच्या साधूला पाहून मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले. तेच ओळखीचे तेजस्वी डोळे, तोच कांतीमान चेहरा. दाढी मात्र आता पांढरी झाली होती. त्या साधूला पुन्हा आपल्या दारावर पहाताच सावकारपुत्राचा संताप अनावर झाला. त्याच्या हातातली फळे खाली पडली. डोळ्यात संताप उतरला. दाराला टेकवलेली मजबुत काठी हातात घेत तो ओरडला “अरे मुर्खा, तुझ्यामुळे माझ्या पत्नीची, मुलाची आणि माझी ताटातुट झाली. अगणीत संपत्ती असुनही मी निर्धनाचे आयुष्य जगलो. का केलेस असे?” असे म्हणत त्याने सगळा जीव एकवटून समोरच्या साधूच्या मस्तकावर काठीने प्रहार केला. क्षणात साधू खाली कोसळला. अतीशय रागाने त्या ब्राह्मण साधूच्या निष्प्राण देहाकडे पहात सावकारपुत्राने आपल्या नगराच्या दिशेने धाव घेतली.

बुधवार, २५ जुलै, २०१८

मा.ल.क. - ६

या म्हातारपणात त्याला काय हवे होते? त्याने आपल्या पूर्वायुष्याकडे पहिले तेंव्हा त्याला अपवाद वगळता सर्व सुखच दिसले. साध्या भोळ्या आई वडिलांच्या पोटी जन्म. योग्य वयात लग्न. मनासारखी, जीव लावणारी बायको. सोन्यासारखी मुलं. रानात मोती उपजणारी पोटापुरती जमीन. गावात, भावकीत मान. मुलांनी मनावर घेऊन हट्टाने घडवलेली तीर्थयात्रा. काही बाकी राहिले नाही. पण या सगळ्याला नजर लागू नये म्हणून की काय, देवाने एक बोच त्याच्या मनाला लावून ठेवली होती. त्याचा धाकटा मुलगा. तसा धाकटा कामाला, व्यवहाराला, माणुसकीला कशा कशाला कमी पडायचा नाही. रानात राबायला लागला तर थोरल्याला इरेसरीने मागे टाकायचा. रानात कधी कोणतं पीक घ्यायचे याचा अंदाज कधी चुकला नाही त्याचा. पण होता एकदम एककल्ली. वडील सांगताहेत किंवा भाऊ सांगतोय म्हणून कधी ऐकणार नाही. त्याला पटले तरच एखाद्या कामाला हात घालणार. वडीलांनी परोपरीने समजावून सांगीतलेबाळा, चारचौघांचे ऐकावे लागते कधी कधी. असं मनासारखं वागून नाही पार लागत जिंदगी.” पण धाकटा ठाम होता विचारांवर. एक दिवस म्हातारा रानातून आला तोचअंगात कणकणघेऊन. हात पाय धुवून ओसरीवर बसला. थोरल्याच्या बायकोने दिलेल्या चहाला जेंव्हा तो नको म्हणाला तेंव्हाच तिच्या लक्षात आले कीआज मामांचं काहीतरी बिनसलय.’ तिने रात्री गरम गरम माडगं दिले म्हाताऱ्याला प्यायला आणि अंथरुन घालून म्हणालीमामा, पडा आज लवकर. सकाळपर्यंत बरं वाटेल.” सकाळी म्हाताऱ्याला जाग आली तिच ग्लानीमध्ये. त्याने डोळे किलकीले करुन पाहीले. अंथरुनाभोवती दोन्ही सुना आणि थोरला चिंतातुर होवून बसले होते
त्याने खुनेनेच विचारलेधाकटा कुठं आहे?”
इतक्यात धाकटाही वैद्याला घेवून आला. वैद्यबुवांनी बराच वेळ तपासले. कसलेसे चाटन दिले आणि सकाळी परत येतो सांगुन गेले. म्हाताऱ्याला जाणवले की आता देवघरातलागंगाजलाचा गडूफोडायची वेळ आली आहे. तो क्षिणसा हसला आणि दोन्ही मुलांना जवळ बोलावून घेतले
खोल पण समाधानी आवाजात तो मुलांना म्हणालाहे पहा पोरांनो, फार ईच्छा होती की त्यानेचालता बोलतान्यावे, त्याने तेही ऐकलं. आता काही राहीलं नाही. मी आयुष्यभर जे काही जमवले त्याची वाटणी करतो त्यात समाधान माना म्हणजे मी सुखाने जातो.” 
सगळ्यांनी डोळे पुसत माना डोलावल्या. म्हाताऱ्याने घर, जमीन, दागीने इतरही काही गोष्टी यांची मनाप्रमाणे वाटणी केली. मुलांचा अर्थात वाटणीलाच विरोध होता पण वडीलांच्या ईच्छेपुढे त्यांनी सगळ्याला निमुट होकार दिला
वडील म्हणालेआता एकच आणि महत्वाचे राहीले. मी वडीलांकडुन चालत आलेलं आपल्या कुलदेवीचे सगळं मनापासुन केले. आज जे काही आहे ही देवीचीच कृपा. आता याची जबाबदारी दोघांपैकी एकाने घ्यावी अशी माझी फार ईच्छा आहे.”
दोघा भावांनी एकमेकांकडे पाहीले. थोरला काही बोलायच्या आत धाकटा म्हणालाबाबा, तुम्ही जे म्हणाला त्याला आम्ही होकार दिला. फक्त तुमच्या समाधानासाठी. पण हेदेवीचे काही माझ्याच्याने होणार नाही. ते दादाकडे सोपवा. माझी देवी रानातल्या ढेकळात आहे आणि तिची मी मनापासुन सेवा करतो आहे.”
थोरल्याने जरा रागातच धाकट्याकडे पाहून वडीलांचा हात हातात घेतलाबाबा, मी करीन सगळं आपल्या कुलदेवीचे. तुम्ही काळजी करु नकाते शब्द ऐकतच म्हाताऱ्याने समाधानाने कुडी सोडली.

दिवस जात होते. थोरला आणि धाकटा आपापल्या रानात राबत होते. पण थोरल्यावर देवीचीही जबाबदारी होती. तिची व्रत-वैकल्ये, उपास, पुजा, वर्षाचे सण, दोन वेळचा नैवद्य यात त्याचा बराच वेळ जाई. या सगळ्यामध्ये त्याचे शेतीकडे आणि स्वतःच्या तब्बेतीकडेही दुर्लक्ष होई. पण वडीलांना दिलेला शब्द पाळल्याचे समाधानही त्याला होते. दिवस जाता जाता हळूहळू पालटले. ते छोटे घर पुरेसे पडेना म्हणून धाकट्याने शेतातच टुमदार घर बांधले. त्याला आता शेतावर जास्त लक्ष पुरवता यायला लागले. थोरल्यानेही घर मोकळे झाल्याने देवघर व्यवस्थित बांधून घेतले. फुलांसाठी बाग जोपासली. पुजेमधे, व्रत-वैकल्यांमधे त्याचा जास्त वेळ जायला लागला. पण उपवासांमुळे थोरल्याची तब्बेत ठिक राहीनाशी झाली. परिणामी शेतीकडे त्याचे दुर्लक्ष व्हायला लागले. आर्थीक बाजूही घसरली. रोज काही ना काही अडचण ऊभी राहू लागली. या सगळ्याचा संबंध थोरलाआपल्याकडून देवीचे काहीतरी करायचे राहीलेयाच्याशी लावू लागला. कधी पुजेला बेल नव्हते म्हणून मुलगी आजारी पडली. तर कधी नैवेद्य दाखवायचा राहून गेला म्हणूनच धान्याला भाव मिळाला नाही. आज काय तरनकोते खावून दर्शन घेतले म्हणून पिकावर रोग आला. तिकडे धाकट्याची दिवसेंदिवस प्रगती होत होती. थोरला वैतागला. देवीचे इतके करुनही थोडे काही चुकले तर देवी शिक्षा का करते आपल्याला? आज त्याने देवीकडे याचे गाऱ्हाणे घालायचे ठरवले. सकाळी अंघोळ करुन त्याने देवीची यथासांग पुजा बांधली, स्तुती स्तवने गायली आणि व्याकूळतेने देवीला हाक मारली. आज देवीने त्याच्या हाकेला दिली आणि प्रकट झालीबोल बाळ, का हाक मारलीस?” 
त्याने नतमस्तक होत विचारलेआई, माझे थोडेही चुकले तर तू मला शिक्षा करतेस. आणि धाकट्याला तुझी साधी आठवणही नाही तरी तु काहीच का करत नाहीस?”
देवी मंद हसली आणि म्हणाली
तो जर मला मानतच नाही तर त्याला कशी शिक्षा करु मी?”



Share

पारध

मी पुण्यात जेथे रहातो त्या सोसायटीशेजारी देवराई आहे. खरेतर देवराईमधेच आमची सोसायटी आहे. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पुर्ण देवराई पार करुन याव...